बारामती : राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने धुमाकूळ घातला आहे. कोकणताली रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड येथे पाऊस पडतोय. तर पुण्यातील काही तालुक्यांमध्ये पावासने अक्षरश: थैमान घातल्याचं बघायला मिळालं आहे. पुण्याच्या बारामती तालुक्यात तर मान्सून पूर्व पावसाने 40 वर्षांचा रेकॉर्ड मोडला आहे. इथे ओढे, नाले आणि तलावांना नद्यांचं स्वरुप प्राप्त झालं आहे. बारामती आणि दौंड तालुक्यांना पावसाने झोडपून काढलं आहे. मुसळधार पावसामुळे बारामती तालुक्यातील 3 इमारती खचल्या आहेत. यामुळे चिंता वाढली आहे. या घटनेनंतर इमारती नागरिकांनी तातडीने जवळील पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे.
बारामतीमधील एमआयडीसी पेन्सिल चौका शेजारील तीन बिल्डिंग पावसाने खचल्या आहेत. साईरंग, ऋषिकेश आणि श्री समर्थ अशी बिल्डिंगची नावे आहेत. तिन्ही बिल्डिंगमधील रहिवाशांनी पोलीस स्टेशनला धाव घेतली. सद्यस्थितीत सर्व फ्लॅट रिकामे करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे फ्लॅटमधील सर्व नागरिक रस्त्यावर आले आहेत. प्रशासनाकडून या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्याचे काम सुरु असल्याची शक्यता आहे.
Leave a Reply